लातूर : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर आलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर विमानतळावरून बुधवारी होणारे उड्डाण अचानक रद्द झाले. विमान दोनवेळा धावपट्टीवरून परत आल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.
पाणीपुरवठा मंत्री पाटील हे दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी विमानाने लातूरला आले होते. जिल्ह्यातील प्रचार सभा आटोपून त्यांची परतीची वेळ दुपारी ४.३० वाजताची होती. ते ४.४५ वाजेदरम्यान विमानतळावर पोहोचले. त्यानंतर पायलटने मंत्र्यांना घेऊन उड्डाणाची तयारी केली. विमान धावपट्टीवरून धावले, मात्र पुढे जाऊन ते परत आले. पुन्हा दुसऱ्यांदा उड्डाणाचा प्रयत्न केला गेला. मात्र त्याहीवेळी विमान धावपट्टीवरून परत फिरले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

