पुणे

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही

उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे उत्पादनात अवाजवी घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.

हार्वेस्टरमुळे उत्पादनात घट प्रत्यक्षात कापणीदरम्यान होणारी हानी असते. ही हानी प्रामुख्याने शेतजमीन समतल नसणे, शिफारसीनुसार ओळीतील अंतर नसणे, ऊस आडवा पडलेला असणे, बेस कटरची उंची चुकीची असणे, अपुरी ओलावा स्थिती, प्रशिक्षित ऑपरेटरचा अभाव यामुळे होते. ही सर्व कारणे व्यवस्थापनाशी संबंधित असून हार्वेस्टर तंत्रज्ञानातील दोष नाहीत. भारतीय कृषी संशोधन संस्था, राज्यातील कृषी विद्यापीठे व साखर कारखान्यांच्या अभ्यासानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी साधारण २ ते ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने केलेल्या कापणी इतकीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *