राष्ट्रीय

अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागेपर्यंत ओम बिर्ला अध्यक्षस्थानी बसणार नाहीत

बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी, म्हणजेच ९ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावासाठी किमान ५० खासदारांचे समर्थन आवश्यक असते. त्यानंतर पीठासीन अधिकारी या प्रस्तावावर चर्चा घडवून आणू शकतात. ओम बिर्ला यांनी मंगळवारीच लोकसभा सरचिटणीसांना या प्रस्तावाची कायदेशीर तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मंगळवारी दुपारी १:१४ वाजता ‘नियम ९४सी’ अंतर्गत लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ११८ खासदारांनी या नोटीसवर स्वाक्षरी केली असून अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या जागेपर्यंत येऊन अनुचित प्रकार करतील, अशी माहिती मिळाल्यामुळे मीच मोदींना सभागृहात न येण्याची विनंती केली, असे विधान बिर्ला यांनी केले होते; यावरूनही विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

आता ९ मार्चला संसदेत काय घडते आणि ओम बिर्ला यांच्या भवितव्याचा काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *