Sports

१९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामना: भारताच्या ४८ षटकांत ३८५ धावा, वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची तुफानी खेळी

झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या तुफानी खेळी केली आहे.


Story Line :
SHABD,Mumbai, February 6,

6 फेब्रुवारी, नवी दिल्ली :  
झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ८  बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला आहे.
      वैभवनं अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीनं १७५ धावा केल्या. त्याला कर्णधार आयुष म्हात्रेनं ५३, तर  अभिज्ञान कुंडूनं ४० धावांची साथ दिली. भारताकडून सध्या मैदानावर कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल हे फलंदाजी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *