गोंदिया : महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील बेस कॅम्प मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपविलेला शस्त्रसाठा व स्फोटके गोंदिया पोलिसांनी हस्तगत केली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राबविलेल्या अभियानात एके-४७, एसएलआरसह अनेक शस्त्रे व स्फोटक साहित्य सापडल्याची माहिती शुक्रवारी (दि. ३०) गोंदिया पोलिस दलाने दिली. महाराष्ट्र शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली […]
Month: February 2026
ट्रकच्या धडकेत वडिलांचा जागीच अंत, मुलगा गंभीर; आरमोरी येथील घटना
आरमोरी तालुक्यातील आकापूर येथून नातेवाईकांकडे भेट देऊन परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. किटाळी चौकात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले. तुळशीदास रामाजी सहारे (५४, रा. देऊळगाव ता. आरमोरी) असे मृताचे नाव […]
अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन
मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात श्रीगुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना […]
बोरगाव मंजूजवळ कार अपघातात दोघांचा मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील घटना
बोरगाव मंजू (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नवीन बायपास वाय-पॉईंटजवळ धावत्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) व अनिता खुशरंग मायवाड […]
वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून ‘वरात’
काही दिवसांपूर्वी वसमत येथील कोर्टा पाटी परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाला लुटून पसार होणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तपास प्रक्रियेसाठी या आरोपींना मंगळवारी (१३ जानेवारी) वसमत शहरात आणले असता, पोलिसांनी त्यांची शहरातून ‘वरात’ काढली. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसमत शहरातून आंबा […]
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द
लातूर : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर आलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर विमानतळावरून बुधवारी होणारे उड्डाण अचानक रद्द झाले. विमान दोनवेळा धावपट्टीवरून परत आल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. पाणीपुरवठा मंत्री पाटील हे दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी विमानाने लातूरला आले होते. जिल्ह्यातील प्रचार सभा आटोपून त्यांची परतीची वेळ दुपारी ४.३० […]
बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश
आरोग्य विभागातील भरती घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्यसेवक (क) या पदाचे बोगस नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारांची १५ ते १७ लाख रुपयांना फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बोगस आदेशांवर चक्क उपसंचालकांच्या पत्रावर धाराशिवच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी स्कॅन करून लावण्यात आली आहे. हेच आदेश […]
‘मंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका
राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल […]
७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!
तालुक्यातील दाभड येथे ७५ वर्षीय पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या होऊन आठवडा उलटला, तरी आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी दाभड येथील शेकडो ग्रामस्थांनी अर्धापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनावर धडक मोर्चा काढला. “आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला […]
विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु होती, ती अंतिम टप्प्यात आली होती, असे दावे केले जाऊ लागले आहेत. या दाव्यांतील तथ्ये ती करणाऱ्यांनाच ठाऊक असली तरी, एक मात्र खरे. निवडणुकीपूर्वीच मनोमिलन झाल्याचे लढतींवरून स्पष्ट होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते […]










