महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्री विचारांनी प्रभावित होऊन तसेच आई-वडिलांच्या व आजी आजोबांच्या संस्कारांनी घडलेले व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यशाची उत्तुंग शिखरे गाठत असता ना देखील सामाजिक भान लक्षात घेऊन आपली वैयक्तिक प्रगती साधत असताना सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व ग्रामीण आदिवासी भागातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थी […]
Month: February 2026
हे राजकीय संस्कार येणाऱ्या पिढीत रुजतील का ?
राजकारणात असणाऱ्या तरुण नेत्यांना आदर्श संदेश देणारी कृती राजकीय संस्कृती आणि संस्कार….. देणारे माजी मंत्री पदमाकर वळवी आज काल व्यासपीठावर खुर्ची मिळावी म्हणून काहीजण नको ते उपद्व्याप करतात.आयोजकांना सांगून स्वतः चे नाव घ्यायला लावतात आणि स्वतः व्यासपीठावर बसण्यासाठी सोय लावतात. मात्र व्यासपीठा वरील संस्कृती काय असते ? प्रगल्भता आणि समय सूचकता काय असते याचे उत्तम […]
मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ
शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्या […]
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे […]
१२ हजार शिक्षक आपापल्या जिल्ह्यात परतणार; आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरू
गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात बदलीने जाता येणार आहे. आता ग्रामविकास विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत प्रधान सचिवांनी ६ […]
पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला
खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या दोघांचा साखरपुडा सोहळा झाला. लग्नाच्या तयारीला वेग आला. त्यात मुलीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती, त्या पूजेसाठी तो यवतमाळला आला. त्यावेळी घरी कोणी नसताना तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर एकदा प्रवासातही बलात्कार केला. हे सगळं घडल्यानंतर […]
गोसेखुर्द बॅक वॉटरमुळे प्रभावित ४२ गावे प्रकल्पबाधित की पूरबाधित ?
एकीकडे इंदिरा सागर प्रकल्प (गोसे प्रकल्प) एकदाचा १०० टक्के भरल्याचा आनंद जलसंधारण विभागात साजरा होत असला तरी, दुसरीकडे मात्र या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. जी गावे आणि शेती या प्रकल्पाच्या थेट पाण्याखाली आलीत, अशा १८९ गावांना प्रकल्पबाधित ठरवून पुनर्वसनही झाले आहे. तर ४२ गावांना बैंक वॉटरचा फटका बसत असताना ही […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कंत्राट ‘सॅम […]
नागपुरात १६ वर्षांच्या मुलाकडून दोन चिमुकल्यांवर अनैसर्गिक अत्याचार
नागपूर : रील्स आणि विविध सोशल माध्यमांतून लहान मुलांवर नको त्या गोष्टींचा प्रचंड भडीमार होत आहे. त्यातूनच अनेकदा लैंगिक विकृती बळावतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याहून लहान असलेल्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी मुलगा […]
अजित दादांच्या ‘ऑन स्पॉट’ निर्णयाने ‘एचएमटी’ तांदूळ जनकाला मिळाली होती पाच एकर जमीन
एचएमटी धानाचे जनक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांची २०१० मध्ये जागतिक स्तरावर ‘फोर्ब्स’ने दखल घेतली. मात्र, त्यांच्याकडे हक्काची जमीन नव्हती. दादाजींची संशोधन कीर्ती ऐकून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट नांदेड गाठले. ऑन स्पॉट निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खोब्रागडेंना पाच एकर जमीन व रोख पाच लाख दिले. अजित दादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धडकताच जिल्हाभरातील अनेकांना चटका […]










