जालना

मराठवाड्याचा रेल्वे विकास फास्ट ट्रॅकवर; तीन मार्गांसाठी १४ हजार कोटींचा निधी मंजूर: रावसाहेब दानवे

जालना : मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या अहमदनगर- बीड-परळी, जालना- जळगाव आणि नांदेड- वर्धा या रेल्वे मार्गांसाठी तब्बल १४ हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर शहराला सीईआर प्रोग्राम अंतर्गत निधी मिळणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

जिल्हा परिषद निवडणूक: मतदारांच्या रांगा वगळून इतर ठिकाणी जमावबंदीचे आदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी, कर्मचारी व मतदान करण्यासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. […]

सोलापूर

विचारल्यावर भाजपला…; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?” असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला. सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक […]

सातारा

अवघ्या तीन शाळांत खुली आदिवासी शिक्षणाची कवाडं

आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने २००९ साली सुरू केलेली महत्त्वाकांक्षी शैक्षणिक योजना पाचगणीमध्ये अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि ढिसाळ अंमलबजावणीमुळे आदिवासी मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहण्याची भीती निर्माण झाली आहे. एकेकाळी १२ खासगी शाळांमध्ये राबवली जाणारी ही योजना आज केवळ ३ शाळांपुरती मर्यादित राहिली असून […]

सांगली

मतदानासाठी प्रशासन सज्ज झोनल अधिकाऱ्यांसह किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी १८ लाख १८ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी दोन हजार ३९ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी २४८ झोनल अधिकारी आणि आठ हजार ९७९ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ […]

पुणे

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही

उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे […]

नाशिक

पेपर मिल कंपनीतील माल जळून खाक

नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील एमआयडीसीत धनश्री पेपर रोल कंपनीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील रद्दी पेपर आणि इतर कच्चा माल जळून खाक झाला. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कच्चा माल ठेवला होता त्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. कागदांमुळे आग पसरत गेली. या आगीतील धुराचे लोळ २ […]

कोल्हापूर

कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

किणी – पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळ कांद्याची वाहतूक करणार ट्रक पहाटेच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलावर कोल्हापूरच्या दिशेने कांदा घेऊन येणार ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उलटुन […]

अहिल्यानगर (अहमदनगर)

पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल

शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून, तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहाता […]

नंदुरबार

अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ आज (रविवार) दुपारी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील एका धोकादायक वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम […]