तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘अँथ्रोपिक’ने नुकतेच एक नवीन AI टूल लाँच केले आहे, ज्यामुळे भारतीय आयटी क्षेत्राच्या भविष्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या नवीन ‘एजंटिक एआय असिस्टंट’मुळे केवळ शेअर बाजारातच नाही, तर आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. अँथ्रोपिकचे हे नवीन सिस्टिम फाइल्स वाचणे, दस्तऐवज ड्राफ्ट करणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक […]
Month: February 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यानंतर भारताच्या तेल खरेदी धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. भारतानेरशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, 140 […]
मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू
मेघालयातील ताश्खाई परिसरातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताश्खाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, यामुळे कामगार आत अडकले. स्फोट इतका शक्तिशाली होता […]
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत”; प्रियांका गांधींचा पलटवार
खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधी पक्षाचे सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनपेक्षित घटना घडवण्याचा कट रचत आहेत हा दावा “पूर्णपणे खोटा आणि मूर्खपणा” असल्याचे सांगत फेटाळून लावला. पंतप्रधान आता सभापतींच्या मागे लपून बसले आहेत असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. पंतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नसताना ते सभापतींना खोटे बोलण्यास […]
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच – हसन मुश्रीफ
गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नूल येथे जिल्हा परिषद व […]
सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार का ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, आता सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा […]
भाजप हा बापच, हे लक्षात ठेवा; वैभव पाटील यांचा सुहास बाबर यांना इशारा
विटा : खानापूर मतदारसंघातील शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे लाजिरवाणी आहे. आमदार बाबर हे आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. याचीच आम्हाला लाज वाटते. खरे तर राजकारणात टीका करीत असताना आपल्या कुवतीप्रमाणे व आपल्या बरोबरीच्या लोकांबद्दल बोलणे […]
सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले
मुंबई: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती तांत्रिकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. अंजली दमानिया यांनी असा आक्षेप घेतला होता की, […]
निकालानंतर मिरवणूक, साऊंड सिस्टीम, फटाक्यांसह गुलालावर बंदी
कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मतदारसंघांमध्ये निर्बंध, मतदान केंद्र परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध, मतमोजणी केंद्र परिसरात कलम १६३ लागू यासह निकालानंतर मिरवणूक, रॅली, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम, फटाके व गुलालावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान व […]
“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
मुंबईत भाजपाचामहापौर बनणे हा मुंबईसाठी, १०६ हुतात्म्यांसाठी आणि मराठी मनासाठी काळा दिवस असेल. मुंबईचे अस्तित्व, मुंबईची अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपाने केली आहे. भविष्यात ही मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. भाजपाची भूमिका ही कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात […]










