“बाल विवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश डी. माने, दिवाणी न्यायाधिश क. स्तर, तळोदा उपस्थिती सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच, सर्व विधीज्ञ तळोदा वकील संघ सदरीकरण विद्यार्थी महात्मा फुले एम. एस. डब्ल्यु महाविद्यालय तळोदा. बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडुन बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखुन दिलेल्या NALSA […]
Author: तळोदा वेध खबर
तरुणाईने घडवला आदर्श, समाजाला दिली नवी दिशा
बोरद (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथे समस्त ग्रामस्थ मंडळी व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्ती, शिस्त, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर करत उत्साहात संपन्न झाला. दि. २६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या कीर्तन सप्ताहाचे संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन व अंमलबजावणी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन केले, […]
स्मारक चौकात सर्वपक्षीय शोकसभा घेऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांच्या जवळ विमानात असलेल्या स्वर्गीय शांभवी पाठक (को. पायलट) स्व. सुमीत कपूर (पायलट) स्व. विदीप जाधव (सहयोगी) स्व. पिंकी माली (सहयोगी) याचे निधन झाले या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, उपनगराध्या शितल पाडवी (पटेल) मोती बँकेचे संस्थापक अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, सामाजिक […]
बीजेस व सहयोग सोशल ग्रुप तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
तळोदा येथील भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील प्राचार्य गो.हू महाजन न्यू हायस्कूल येथे जागतिक कर्करोग दिन निमित्त सामाजिक प्रबोधन पर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूलचे प्राचार्य डॉ.अमरदीप महाजन हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून धडगाव चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे […]
आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू
नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने तालुक्यात खडबड उडाली असून चिमुकल्याचा मृत्यूने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. दरम्यान आश्रम शाळेत पाहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील आश्रम शाळेतील आयान अंकेश गावित (वय ६) […]
स्व.शांताबाई चंद्रसिंग गिरासे समाजसेवेचा दीपस्तंभ
स्व. शांताबाई चंद्रसिंग गिरासे यांचा जीवनप्रवास समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. धुळे येथील सूर्यवंशी कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई यांचा विवाह चंद्रसिंग गिरासे यांच्या कुटुंबात झाला. त्यांच्या पतींच्या नोकरी निमित्त ते तळोदा येथे स्थायिक झाले. तळोदा हा मुख्यतः आदिवासी पट्टा असून, येथील गोरगरीबांची स्थिती पाहून शांताबाई यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला. शांताबाई यांनी […]
तळोदा येथील महाजन दांपत्याची शिक्षणात गगन भरारी
महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्री विचारांनी प्रभावित होऊन तसेच आई-वडिलांच्या व आजी आजोबांच्या संस्कारांनी घडलेले व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यशाची उत्तुंग शिखरे गाठत असता ना देखील सामाजिक भान लक्षात घेऊन आपली वैयक्तिक प्रगती साधत असताना सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व ग्रामीण आदिवासी भागातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थी […]
हे राजकीय संस्कार येणाऱ्या पिढीत रुजतील का ?
राजकारणात असणाऱ्या तरुण नेत्यांना आदर्श संदेश देणारी कृती राजकीय संस्कृती आणि संस्कार….. देणारे माजी मंत्री पदमाकर वळवी आज काल व्यासपीठावर खुर्ची मिळावी म्हणून काहीजण नको ते उपद्व्याप करतात.आयोजकांना सांगून स्वतः चे नाव घ्यायला लावतात आणि स्वतः व्यासपीठावर बसण्यासाठी सोय लावतात. मात्र व्यासपीठा वरील संस्कृती काय असते ? प्रगल्भता आणि समय सूचकता काय असते याचे उत्तम […]
मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ
शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्या […]
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे […]









